“जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील” (मत्तय ५:९). आपल्याला स्वतःला देवाचे पुत्र म्हणण्याचा अधिकार आहे का ? येथे म्हटले आहे की आपण स्वतःला देवाचे पुत्र म्हणवून घेत नाही; तर असे म्हंटले आहे की त्यांना देवाचे पुत्र म्हंटले जाईल . याचा अर्थ असा की जेव्हा आपण शांती निर्माण करणारे असतो तेव्हा देव आपल्याला त्याचे पुत्र म्हणून संबोधेल . एक शांतताप्रिय व्यक्ती असा आपला नावलौकिक असला पाहिजे. शांती करणाऱ्याच्या विरुद्ध म्हणजे समस्या निर्माण करणारा. तुमच्या मंडळीमध्ये तुमचा नावलौकिक काय आहे ? कदाचित तुम्ही म्हणाल, “मी समस्या निर्माण करणारा नाही आणि मी शांती निर्माण करणाराही नाही, मी तटस्थ आहे.” ठीक आहे , मग तुम्हाला देवाचा पुत्र म्हणता येणार नाही! येथे म्हटले आहे की “जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.” शांती करणारे ते आहेत जे नेहमी शांततेच्या शोधात असतात.
जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा स्वर्गातून देवदूत आले आणि म्हणाले, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांति ” (लूक २:१४). शांतीचा पाठपुरावा करणाऱ्यांवर देव संतुष्ट असतो . जग सर्व प्रकारच्या भांडनांनी, लढाया, बडबड, कुरकुर आणि तक्रार यांनी भरलेले आहे. जर आपण स्वर्गाच्या दृष्टिकोनातून या पृथ्वीकडे पाहिले तर आपल्याला या सर्व गोष्टींमुळे ती अंधाराने भरलेली दिसेल. परंतु या अंधारात काही ठिकाणी प्रकाशाचे झोत आहेत - ते देवाची मुले आहेत, देवाचे पुत्र आहेत; आणि देवाच्या या पुत्रांचे एक चिन्ह म्हणजे ते शांती निर्माण करणारे आहेत.
फिलिप्पैकरास पत्र २ मध्ये आपल्याला हीच गोष्ट पुनः वाचायला मिळते. आपण सर्व काही कुरकुर, वादविवाद आणि तक्रार न करता केले पाहिजे असे का म्हटले आहे (फिलिप्पैकरास पत्र २:१४)? आपण आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट कोणत्याही कुरकुरीशिवाय, कोणत्याही तक्रारीशिवाय आणि कोणत्याही वादविवादाशिवाय केली पाहिजे - ही एक अतिशय उच्च दर्जाची गोष्ट आहे. पण वचन १५ मध्ये म्हटले आहे की, ह्या एकाच मार्गाने आपण स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतो, “ ह्या कुटिल आणि विपरीत पिढीत देवाची निष्पाप मुले असे स्वतःला सिद्ध करू शकतो .” या अंधकारमय जगात आपण प्रकाश म्हणून दिसण्याचा हा एकमेव मार्ग आहे. ते कसे होऊ शकते ? अंधार म्हणजे काय ? कुरकुर करणे, बडबड करणे आणि तक्रार करणे हे आहे. प्रकाश म्हणजे काय? ते लोक जे शांती करतात आणि बडबड किंवा तक्रार करत नाहीत.
जेव्हा येशूने आपल्या सत्तर शिष्यांना नेमून इस्राएल लोकांकडे ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः नंतर जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना त्याच्या पुढे जाण्यासाठी नियुक्त केले. (लूक १०:१). त्याने त्यांना सांगितले की जेव्हा एखाद्या नगरात प्रवेश कराल तेव्हा तेथे राहण्यासाठी शांतीप्रिय माणूस शोधा. तो म्हणाला, “ ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ‘ह्या घरात शांती असो’ असे म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील. पण जर नसेल तर ती तुमच्याकडे परत येईल. आणि जर तुम्हाला शांतीप्रिय माणूस सापडला तर त्या घरात राहा – त्या घरातून दुसऱ्या घरात जाऊ नका कारण तुम्हाला त्या नगरात असे दुसरे घर क्वचितच सापडेल” (लूक १०:५-६).
दुसऱ्या शब्दांत, तो जे म्हणत होता ते असे होते: “त्या शहरात तुम्हाला कदाचित एकच घर मिळेल जिथे शांतीप्रिय माणूस आहे ”. नाहीतर त्याने त्यांना एका घरातून दुसऱ्या घरात जाऊ नका असे का सांगितले असेल ? जर अशी १०, २०, ३० किंवा १०० घरे असतील तर काय ? येशूला माहित होते की अशी घरे मिळणे केवळ अशक्य आहे. पण अशी घरे ही त्या प्रकारची घरे असतात जिथे देव राहतो.
तुमचे घर शांतीचे घर आहे का? तुमच्याबद्दल असे म्हणता येईल का की तुम्ही एक पती म्हणून शांतीप्रिय माणूस आहात ? भांडण्यासाठी नेहमीच दोन लोकांची आवश्यकता असते; जर एका व्यक्तीने भांडण्यास नकार दिला तर तुमचे भांडण होऊ शकत नाही. हे अगदी तसेच आहे जसे की आवाज होण्यासाठी तुमच्या दोन्ही हातांचा एकमेकांवर आघात होण्याची गरज असते . फक्त एका हाताने टाळी वाजवून तुम्ही आवाज काढू शकत नाही. जर एका हाताने टाळी वाजवण्यास नकार दिला तर दुसरा हात आवाज करू शकत नाही; भांडणाचे असेच आहे. जर कोणी एकाने (म्हणजे पती किंवा पत्नी) भांडण्यास नकार दिला आणि स्वतःसाठी मरण पावला तर भांडण होणार नाही. उलट, शांतता असेल. म्हणून मी कधीही दुसऱ्या व्यक्तीवर शांतीचा अभाव असल्याचा दोष देऊ शकत नाही, मग ते माझ्या मंडळीमध्ये असो किंवा माझ्या घरात असो किंवा इतर कुठेही असो.
तुम्ही असे म्हणू शकत नाही की, “माझी पत्नीच शांतता भंग करते,” किंवा “माझा पती शांतता भंग करतो.” तुम्ही त्या भांडणात आणि लढाईत सहकार्य करता म्हणून शांती नसते. एक हाताने दुसऱ्या हाताबरोबर येण्यास नकार दिला तर आवाज होणार नाही. म्हणून ज्या परिस्थितीत संघर्ष असेल, तिथे जर तुम्ही शांतीचा पाठपुरावा करत असाल, तर तेव्हा तुम्ही स्वतःसाठी मराल आणि दुसऱ्या व्यक्तीला, त्याला किंवा तिला वाटेल तितके ओरडू द्या. मग तिथे शांतता असेल .
जर मी असा विश्वास ठेवतो की देव सार्वभौम आहे आणि तो माझ्या क्षमतेपेक्षा जास्त माझी परीक्षा होऊ देणार नाही, तर मी स्वतःसाठी मरण्यास तयार असेल. बरेच लोक म्हणतात की जर तुम्ही या मार्गाचा अवलंब केला तर लोक तुमचा फायदा घेतील; ते तुमच्याशी एका दाराच्या बाहेर असलेल्या पायपुसण्या सारखे वागतील आणि तुमच्यावरून चालतील. तसे नाही. जर तुम्ही १ करिंथकर १०:१३ वर विश्वास ठेवला, ज्यामध्ये म्हटले आहे की, “देव तुमची परीक्षा तुमच्या शक्तिपलीकडे कधीही होऊ देणार नाही,” तर तुम्ही ओळखाल की तो लोकांना तुमचा फायदा घेऊ देणार नाही आणि तुम्ही आत्मविश्वासाने शांतीच्या मार्गाचा पाठपुरावा कराल . तुम्हाला समजेल , नीतिसूत्रांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “परमेश्वराचे नाम एक बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो ” (नीतिसूत्रे १८:१०). जिथे तुम्हाला वाद आढळतो तेव्हा येशूच्या नावाचा आश्रय घ्या आणि मग तुम्हाला नीतिसूत्रे १६:७ ची पूर्णता आढळेल, की “जेव्हा एखाद्या मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडतात , तेव्हा तुम्ही येऊन प्रभूमध्ये लपता, तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी शांती करावयास लावतो .” देव काय करू शकतो हे विलक्षण हे! मी ते अनुभवले आहे. जर तुम्ही प्रभूला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही आढळेल की तुमचे शत्रूही वश होतात.
“जे शांती करणारे ते धन्य कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.” देवाचे पुत्र याचा अर्थ देवाची मुल याच्या अर्थापेक्षा वेगळा आहे. देवाची मुले लहान बाळांसारखी असतात ; पुत्र म्हणजे एक प्रौढ व्यक्ती जो स्वतःसाठी कसे मरायचे आणि येशूच्या पावलावर कसे चालायचे हे जाणतो.