जेव्हा एखादे पती – पत्नी एकत्र मिळून घर बांधण्याचा प्रयत्न करतात , तेव्हा ते एका वेळी एक विट असे करूण ते घर उभारतात. ही गोष्ट भौतिक आणि आत्मिक अशा दोन्ही अर्थांनी सत्य आहे. आपण वापरत असलेल्या आत्मिक "विटा" कोणत्या आहेत?
त्या जोडप्याचे एकमेकांबद्दलचे विचार आणि जेव्हा ते एकमेकांशी बोलतात ते शब्द; यांची तुलना आपण त्या घराच्या उभारणीत वापरल्या जाणाऱ्या विटांशी करू शकतो. स्वतःचे घर बांधताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या विटा वापरत आहात, हे केवळ तुम्हीच ठरवू शकता. अनेक पती–पत्नी ज्या दर्जाच्या विटा वापरत आहेत, ते पाहता त्यांची घरे कोसळली तर त्यात काहीच नवल नाही.
जेव्हा एखादे भौतिक घर बांधण्याचा प्रश्न येतो, तेव्हा आपण अत्यंत सावधगिरीने आणि खात्रीशीर दर्जाच्या विटा वापरतो; कारण आपल्याला एक दीर्घकाळ टिकणारी वास्तू हवी असते. परंतु भौतिक घरे ही शाश्वत नसतात. एक दिवस ती नक्कीच नष्ट होणार आहेत. आपण ज्या खऱ्या घराकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, ते म्हणजे आपल्या जोडीदाराशी असलेले नाते - जे आपण अनंतकाळासाठी उभारतो. तेव्हा, तुमच्या नात्यातील विचार आणि शब्दांबाबत अत्यंत सावध राहा. ते विचार आणि शब्द एकमेकांबद्दलची पवित्रता आणि चांगुलकी दर्शवणारे असावेत.
इब्री लोकांस पत्र १२:१५ मध्ये "कडवटपणाच्या मुळा" विषयी सावध करण्यात आले आहे. हे कडवटपणाचे मूळ आपल्या मनात, आपल्या जोडीदाराविषयी निर्माण होऊ शकते. तसेच, कलस्सैकरांस पत्र ३:१९ मध्ये पवित्र शास्त्र पतींना अशी आज्ञा देते की, त्यांनी आपल्या पत्नींविषयी कडवटपणा बाळगू नये.
हृदयातील कडवटपणाचे विचार आणि वृत्ती यांचा पूर्णपणे नायनाट केला पाहिजे. आपल्या विचारविश्वात "रक्ताचा ठसा" उमटलेला असावा - म्हणजेच असा एक "वधस्तंभ", ज्यावर आपण स्वतःचा बळी देतो. मला, प्रेम न करण्याचे विचार, स्वार्थी विचार आणि दुरावा निर्माण करणाऱ्या विचारांना मारून टाकणे गरजेचे आहे. ही गोष्ट कधीही विसरू नका की, सैतान नेहमीच तुमच्या आसपास वावरत असतो; आणि तुम्ही तुमचे घर बांधण्यासाठी त्याच्याच विटांचा वापर करावा, या दुष्ट हेतूने तो त्या विटा तुमच्या हाती सोपवत असतो. आपल्या जोडीदाराविषयी कठोर, स्वार्थी, कडवट आणि संशयास्पद विचार मनात आणण्याची जी भुरळ पडते, त्याची जाणीव आपल्यापैकी विवाहित असलेल्या प्रत्येकालाच आहे. केवळ स्वतःच्याच हिताचा विचार करून आपण आपले घर बांधावे, यासाठी सैतान "स्वार्थीपणाच्या विटा" घेऊन येतो. तो तुमच्या जोडीदाराविषयीच्या "संशयाच्या विटा" तुमच्यासमोर आणून ठेवतो. संशयाचा पूर्णपणे नायनाट करा आणि विश्वास ठेवायला शिका. संशयास्पद विचार या सैतानाने आणलेल्या सर्वात निकृष्ट दर्जाच्या विटा आहेत.
त्याचप्रमाणे, आपण उच्चारतो ते शब्दही विटांप्रमाणेच असतात; आणि याच शब्दांच्या साहाय्याने आपण आपले घर उभारतो. जर विवाहित लोकांनी उच्चारलेले सर्व शब्द ध्वनिमुद्रित केले आणि पुन्हा ऐकवले गेले (आणि न्यायाच्या दिवशी खरोखरच असे घडणार आहे), तर मला प्रश्न पडतो की, आपल्यापैकी किती जणांना ते ऐकताना आनंद वाटेल? की आपण लपण्यासाठी पळून जाऊ? ज्या पती- पत्नींनी एकमेकांशी प्रेमळ आणि सौम्य शब्दांत संवाद साधला आहे, त्यांच्यासाठी ही किती आनंदाची गोष्ट असेल! न्यायाच्या दिवशी, संपूर्ण जगाने जरी त्यांचे संभाषण ऐकले, तरीही त्यांच्या मनात त्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास असेल.
आपण कोणीही परिपूर्ण नाही, पण आपण स्वतःला नम्र करायला, चांगले शब्द बोलायला आणि सैतानाने आपल्या जिभेवर पेरलेले वाईट शब्द पूर्णपणे नष्ट करायला शिकू शकतो. पती-पत्नी एकमेकांशी जे काही कुजके शब्द बोलतात, त्या सर्वांचा विचार करा ('तुझे वडील असेच होते' किंवा 'तुझी बहीण तशीच होती' आणि असेच इतर शब्द). हे अत्यंत खेदजनक आहे की, अनेक लोक अशाच 'विटां'चा वापर करून आपले घर उभे करतात. परंतु, अशा खालावलेल्या दर्जात, देवाने आपल्या वचनाद्वारे आपल्याला दिलेल्या उदाहरणानुसार - देवाला गौरव प्राप्त करून देणारे - एक घर उभारणे आपल्याला गरजेचे आहे.
इफिसकरांस पत्र ४:२९ मध्ये असे म्हटले आहे: "तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो ". हे 'कुजके शब्द' म्हणजे जणू काही 'कुजक्या विटा'च आहेत. जर आपण—पती-पत्नी मिळून - या एका साध्या नियमाचे पालन केले: की आपण आपल्या जोडीदाराशी केवळ असेच शब्द बोलू, जे एकमेकांवर कृपा करतील —तर केवळ एका वर्षाच्या आतच, आपण असे एक उत्तम घर उभारू शकू, जे लोकांनी अनेक वर्षे खर्ची घालून उभारलेल्या त्या सर्व 'कुजक्या घरां'पेक्षा कितीतरी श्रेष्ठ असेल. आपल्यापैकी प्रत्येकासाठीच हे साध्य करणे नक्कीच शक्य आहे. तुमच्या घरातच एखाद्याची निंदानालस्ती करण्याचा मोह तुम्हाला नक्कीच होईल. पण लक्षात ठेवा, तो केवळ एक मोह असतो. जर तुमच्या घरी कोणी पाहुणे आले आणि तुम्ही त्यांच्यासमोर गप्पांच्या ओघात दुसऱ्यांची निंदा करू लागलात, तर तुम्ही तुमचे घर 'कुजक्या विटां'नीच बांधत आहात असे समजावे. सैतानाने तुमच्या हाती त्या 'कुजक्या विटा' सोपवल्या आहेत आणि तुम्हीही त्या तत्परतेने स्वीकारल्या आहेत. तुमच्या घराच्या बाबतीत सैतानाला असे काहीही करू देऊ नका.
यात काहीच शंका नाही की—जर तुम्ही देवाच्या उदाहरणाचे गांभीर्याने पालन करण्याचा दृढ निश्चय केला—तर तुमचे घर खरोखरच स्वर्गासारखे सुंदर आणि सुखद बनेल.
अनुवाद ३३:१६ मध्ये, देवाचा उल्लेख " झुडपात वास करणारा “ असा करण्यात आला आहे ". हा संदर्भ निर्गम ३ मधील घटनेशी जोडलेला आहे; जिथे देवाने एका जळत्या झुडपातून मोशेशी संवाद साधला होता. पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेले, हे देवाचे पहिले निवासस्थान आहे. ते झुडूप जेव्हा अग्निने जळत होते , तेव्हा त्यामध्ये कोणतेही जंतू किंवा जीवाणू जिवंत राहू शकले असतील, याची तुम्ही कल्पना करू शकता का? त्या अग्निने प्रत्येक जंतू आणि जीवाणूचा पूर्णपणे नाश केला असेल .
आपल्या घरांमध्ये असलेले सर्व जंतू आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी, आपल्यालाही तशाच अग्नीची - म्हणजेच पवित्र आत्म्याच्या अग्नीची - गरज आहे. मी कोणत्या जंतूंचा आणि जीवाणूंचा येथे संदर्भ देत आहे? ते म्हणजे, आपल्या मनात एकमेकांबद्दल येणारे ईश्वरेतर विचार, आपण उच्चारत असलेले निष्ठुर व कुजके शब्द, अनावश्यक गप्पाटप्पा, निंदानालस्ती इत्यादी. जेव्हा आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण असतो - जेव्हा पवित्र आत्म्याचा अग्नि आपल्या घरांवर व्यापलेला असतो - तेव्हा आपले घर पूर्णपणे निर्जंतुक (शुद्ध) झालेले असते. आपले घर भौतिकदृष्ट्या कितीही अव्यवस्थित असले, तरी त्यामुळे काहीच फरक पडत नाही; परंतु आपले शब्द आणि विचार मात्र पूर्णपणे स्वच्छ व शुद्ध असणे अत्यावश्यक आहे.
देव कशाला महत्त्व देतो आणि मनुष्य कशाला महत्त्व देतो, यातील हाच मुख्य फरक आहे. परूशी लोक केवळ बाहेरून स्वच्छ आहेत; परंतु येशूचे शिष्य मात्र आपला अंतरात्मा (अंतर्मन) स्वच्छ ठेवतात. त्यांचे विचार आणि शब्द अत्यंत प्रामाणिक व सरळ असतात, जेणेकरून देव त्यांच्या घरांमध्ये वास्तव्य करू शकेल. जर आपण अशा शुद्धतेचा ध्यास घेतला, तर आपली घरेही जुन्या करारातील त्या 'मंडपा'सारखी बनतील, जिथे खुद्द देवाचे गौरव अवतरले होते. आपल्यात जर अशी अनेक घरे निर्माण झाली, तर ती खरोखरच एक अत्यंत अद्भुत गोष्ट ठरेल. त्या झुडुपात वास करणारा देव, अशा घरातही वास करेल जिथे त्याचे गौरव केले जाऊ शकेल.