WFTW Body: 

“नितीमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे” (मत्तय ५:१०). आपण आधी पाहिले, “जे आत्म्याने दीन ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” जेव्हा आपण नम्रतेचा मार्ग स्वीकारुण शांतीच्या मार्गात चालतो, नीतिमत्तेसाठी भुकेले आणि तहानलेले असतो, सौम्यतेणे वागण्याचा पाठपुरावा करतो आणि आपण आपल्या हक्कांसाठी लढत नाही, तेव्हा आपल्याला आढळेल की जगात आपल्याला असे लोक भेटतात जे दुष्टपणे आपला छळ करणारे आहेत. जे लोक धार्मिकतेच्या मार्गाने जगू इच्छितात त्यांचा छळ केला जाईल. म्हणून जेव्हा आपण नीतिमत्तेणे जगण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपला छळ होईल.

२ तीमथ्य ३:१२ हे पवित्र आत्म्याने प्रेरित एक परिपूर्ण विधान आहे. पौल म्हणतो, “ख्रिस्त येशूमध्ये धार्मिकतेने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ केला जाईल.” ते असे म्हणत नाही की “काहीजणांचा”; ते असे म्हणत नाही की “अनेकांचा”; ते असे म्हणत की “बहुतेकांचा”. ते काही, अनेक, बहुतेक किंवा सर्व असे असू शकले असते. तिथे "सर्व" असे म्हंटले आहे. सर्वांमध्ये, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक विश्वासनाऱ्याचा समावेश आहे (स्वतःला विश्वासणारा म्हणवणारा प्रत्येक व्यक्ती नाही, तर ईश्वरीय जीवन जगू इच्छिणारा प्रत्येक व्यक्ती) .

नितीमत्वाकरिता छळले जाण्याचा अर्थ काय आहे ? नितीमत्वाकरिता उभे राहण्याचा अर्थ काय आहे याचा आपण विचार केला पाहिजे.याचा अर्थ असा की तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा काही परिस्थितीत तुम्ही म्हणता, "मी जे चुक आहे ते करणार नाही." अशी अनेक कामे आहेत ज्यात लोक तडजोड करतात - ते खोटे बोलतात, फसवणूक करतात आणि काहीतरी अनैतिक काम करूण घेण्यासाठी लाच देतात. जेव्हा ख्रिस्ती त्या मार्गाने जातात, तेव्हा त्यांना अर्थातच छळाचा सामना करावा लागणार नाही; परंतु जर त्यांनी त्या मार्गाने जाण्यास नकार दिला, जर त्यांनी लाच घेण्यास नकार दिला, किंवा काहीतरी अनैतिक काम करण्यास नकार दिला, तर त्यांना त्यांच्या वरील लोकांकडून, ज्यांना त्या लाचे मधून मिळणाऱ्या पैशांचा काहीतरी वाटा हवा आहे धमक्या येऊ शकतात. अशी अनेक प्रकरणे आहेत. जेव्हा तुम्ही नीतिमत्तेसाठी उभे राहता तेव्हा तुम्ही तुमची नोकरी गमावू शकता किंवा तुमच्या मालकांकडून तुम्हाला नापसंती मिळू शकते, परंतु स्वर्गाचे राज्य तुमचे आहे. त्या प्रक्रियेत तुम्ही कदाचित या पृथ्वीवरील काहीतरी गमवाल - कदाचित एखादे पद, कदाचित काही बढती - पण त्या बदल्यात तुम्हाला स्वर्गातील काहीतरी मिळेल. ते त्याच्या बदल्यात योग्य आहे का?

एखाद्या व्यक्तीने प्रवेश मिळविण्यासाठी किंवा एखाद्या परिस्थितीत नोकरी मिळविण्यासाठी खोटे बोलणे योग्य आहे का? ते योग्य नाही! ख्रिस्ती व्यक्तीसाठी ते कधीही फायदेशीर नाही. देवाच्या इच्छेबाहेर असल्याने त्याने ते न करणे हे खूप चांगले आहे. जर तुम्ही एखाद्या परिस्थितीत खोटे बोलून प्रवेश मिळवला तर तुम्ही खात्री बाळगू शकता की देवाने तुम्हाला तिथे नेले नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या अडचणीत असता तेव्हा सैतान तुम्हाला म्हणू शकतो, "येथे खोटे बोला कारण असत्य सर्वशक्तिमान आहे; ते तुम्हाला काहीही मिळवून देऊ शकते." आणि पवित्र आत्मा म्हणतो, "नाही, ते खोटे आहे; देव सर्वशक्तिमान आहे. खोटे बोलणे हा तुम्हाला हवे ते मिळवण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग नाही. देवासाठी उभे रहा. देवाला तुम्हाला जे मिळावे असे वाटते ते देण्यास तो सक्षम आहे." मग तुम्हाला आढळेल की देव तुम्हाला जे मिळायला हवे ते देईल.

मी नौदलात काम करत असताना मला असे अनेक प्रसंग आठवतात जेव्हा मला माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उभे राहून म्हणावे लागले, "मला माफ करा, साहेब, मी ते करू शकत नाही कारण माझा विवेक मला परवानगी देत नाही. मी एक ख्रिस्ती आहे." आणि सैन्यात असे म्हणणे खूप जोखमीचे आणि धोकादायक आहे. जर तुम्ही खाजगी नोकरीत असे म्हटले तर तुम्हाला बरखास्त करूण नोकरीवरून काढून टाकले जाईल. पण जेव्हा तुम्ही सैन्यात असे म्हणता तेव्हा तुमच्याविरोधात सैनिकी न्यायालयात खटला चालवला जाण्याचा धोका असतो, म्हणजे न्यायालयात नेले जाईल आणि कदाचित तुरुंगात टाकले जाईल, कारण सैन्यात आदेशांचे पालन न करणे ही खूप गंभीर गोष्ट आहे. मला असे अनेक प्रसंग आठवतात जिथे असे घडले आणि मला देवावर विश्वास ठेवावा लागला की तो माझी काळजी घेईल. जर त्यांनी मला माझ्या विवेकाला आव्हान देणारे काही करायला सांगितले तर मी म्हणायचो, "माफ करा, साहेब, मी एक ख्रिस्ती आहे, मी ते करू शकत नाही." तो अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी त्याचा मला फरक पडत नव्हता.

यामुळे मला काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला, म्हणजेच कमांडिंग ऑफिसर मला पदोन्नतीसाठी चांगली शिफारस देत नसत. एकदा माझी अर्ध्या तासाच्या आत दुसऱ्या पदावर बदली झाली. मला गैरसोय होऊ शकते, पण ते ठीक आहे. तुम्ही याला छळ अजिबात म्हणू शकत नाही; पूर्वीच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याना खाऊन टाकणाऱ्या सिंहांच्या तुलनेत हे लहान डासांच्या चाव्यासारखे आहे. पण सुरुवातीच्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यानी याचाही सामना केला.

देव तुमची यात परीक्षा घेईल. मला माहित आहे की देवाने वेगवेगळ्या वेळी माझी परीक्षा घेतली आहे आणि मला विश्वास आहे की जर मी त्या ठिकाणी त्या परीक्षेत अपयशी ठरलो असतो, तर मी आज जिथे आहे तिथे नसतो आणि देवाने मला दिलेली सेवा माझ्याकडे नसती. जर तुम्ही नीतिमान असता आणि धार्मिकतेसाठी काही ठिकाणी जगीक नुकसान सहन करण्यास तयार असता तर कदाचित तुम्हाला सेवा मिळू शकली असती. स्वर्गाचे राज्य अधिक प्रमाणात तुमचे असू शकले असते, परंतु तुम्ही त्यातील काही गमावले. तुम्ही भूतकाळाबद्दल काहीही करू शकत नाही; तुम्ही जे गमावले आहे ते गेले आहे आणि तुम्ही ते परत मिळवू शकत नाही. परंतु तुम्ही भविष्याबद्दल काहीतरी करू शकता. म्हणा, "प्रभु, किमान येणाऱ्या काळात, मी जे नीतिमान आणि प्रामाणिक आहे त्यासाठी उभे राहू इच्छितो." ख्रिस्ती व्यक्तीने कोणत्याही क्षेत्रात कुटिल( अप्रामाणिक) असू नये. ख्रिस्ती व्यक्तीने कोणत्याही प्रकारच्या फायद्यासाठी खोटे बोलू नये किंवा फसवणूक करू नये. देव अशा लोकांना शोधत आहे जे प्रामाणिक आहेत जेणेकरून तो त्यांना अधिक मोठी सेवा देऊ शकेल.